ताज्या घडामोडी

सातारा जि.प.अध्यक्ष निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्रित येणार..!

(फलटण/ प्रतिनिधी)- नुकतेच सातारा जिल्हा परिषद व तालुकानिहाय पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील, श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर व खा. नितीन पाटील यांची एकत्रित बैठक संपन्न

सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गटांपैकी २७ जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला तर राष्ट्रवादी काँग्रेसनं २० जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेनं १५ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला तर इतरांनी २ जागांवर विजय मिळवला आहे. या निकालांमुळं साताऱ्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आता शिवसेना ठरविणार

साताऱ्यात भाजपचे ४ आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २ तर शिवसेनेचे २ आमदार विधानसभेला निवडून आले होते.यानंतर सत्ता स्थापनेमध्ये सातारा जिल्ह्याला भाजपाने २ मंत्री पदे दिली त्यामुळे सातारा हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जाऊ लागला अशा या बालेकिल्ल्यातच आता राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येऊन भाजपला विरोधात बसविणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारणही तसेच आहे भाजपाचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुदत् व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्या बालेकिल्लाला भगदाड पाडण्याचा प्रयत्न केला तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्यावरही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये टोकाची टीका केली होती. त्यामुळे एकाच वेळी भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अंगावर घेतले त्याचाच परिणाम म्हणून की, काय जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषदे मध्ये सत्ता स्थापन करणार अशा चर्चांना तोंड फुटले आहे.

जिल्ह्यामध्ये भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येणार? का असा सवाल निर्माण झाला आहे. तशा आशियाने कालच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे साई मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर नितीन पाटील यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा होऊन कस त्याही परिस्थितीमध्ये आता भाजपला रोखणे महत्त्वाचे असून जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊन सत्तेचा फॉर्मुला ठरविणार असल्याचे अधिकृत संकेत मिळत आहेत आणि त्या दृष्टीने हालचालींना आता वेग आला आहे.

भाजप 27 जागेवर विजयी होऊन मोठा पक्ष असला तरी सत्तेसाठी भाजपला मित्र पक्षातल्याच पक्षांची मदत घ्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसनं २० जागांवर विजयी तर शिवसेना १५ जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा राष्ट्रवादी शिवसेनेकडे असल्याने भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यात येईल का? असा सवाल ही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी
मंत्री शंभूराजे देसाई यांच्या घरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने झालेली चहा पे चर्चा यशस्वी झाली आहे.चर्चेसाठी रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन काका पाटील यांसारखे मातब्बर नेतेमंडळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी भेटीला गेले होते.

महायुतीतील पक्षांमध्येच जिल्हा परिषद निवडणुकीत संघर्ष
सातारा जिल्ह्यात विधानसभा लोकसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युतीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली होती. नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वबळाचे वारे भाजपकडून वाहू लागले त्यानंतर भाजपने राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे मंत्री मकरंद पाटील यांची नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच कोंडी केली होती. वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने वाई नगरपालिकेवर झेंडा फडकवला आणि मंत्री मकरंद पाटील यांना शह दिला होता. त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई व श्रीमंत संजीव राजे यांना टार्गेट करण्यात आले होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!