आपला जिल्हा

पाण्याची बाटली झाली महाग ..! प्लास्टिक कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम..!

(फलटण /प्रतिनिधी )प्लास्टिक बाटल्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने पॅकेज्ड पाण्याच्या बाटल्यांचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्लास्टिक बाटलीसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च तब्बल ५० टक्क्यांनी वाढून सुमारे १७० रुपये प्रति किलो झाला आहे. तसेच बाटलीच्या झाकणाची किंमत दुप्पट होत ०.४५ रुपये प्रति नग इतकी झाली आहे.

 हॉटेल व्यवसायिकांवर महागाईमुळे परिणाम…!

 पाणी बॉक्स पूर्वी 80/90रुपये

आता 100/110 रुपये

या शिवाय कोरुगेटेड बॉक्स, लेबल्स आणि चिकटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टेपच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी बाटली उत्पादक कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला असून उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे.

एका अहवालानुसार, भारतातील एकूण प्लास्टिक उत्पादनात सुमारे ३५ ते ४० टक्के वाटा गुजरात राज्याचा आहे. येथे १० हजारांहून अधिक प्लास्टिक उत्पादन युनिट्स कार्यरत आहेत. मात्र इस्रायल-इराण संघर्षानंतर पॉलिमरच्या किमतीत झालेल्या वाढीचा या उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे.

गेल्या १२ दिवसांत PET पॉलिमरच्या किमती सुमारे ४० टक्क्यांनी वाढल्या असून प्रति किलो १८ ते ३२ रुपयांपर्यंत दरवाढ झाल्याची माहिती उद्योग संघटनांनी दिली आहे. त्यामुळे लहान उत्पादकांवर मोठा दबाव निर्माण झाला असून जुन्या दरात ऑर्डर पूर्ण करणे कठीण होत आहे.

सध्या किरकोळ बाजारातील दर मोठ्या प्रमाणात वाढले नसले तरी उत्पादन खर्च वाढल्याने येत्या काही दिवसांत पाण्याच्या बाटल्यांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!