आपला जिल्हा
लोकवर्गणीतून पर्यावरण संवर्धनाची नवी चळवळ ; जिंती गावाचा ‘सह्याद्री देवराई’ अंतर्गत ग्रीन जिंती प्रोजेक्ट जिल्ह्यासाठी प्रेरणादायी


जिंती येथे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ग्रीन जिंती प्रोजेक्ट २०२६ अंतर्गत वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन अभियानाचा शुभारंभ तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, डॉ. विजय रणवरे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, युवराज पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार डॉ. जाधव म्हणाले की, वाढत्या तापमानामुळे झाडांचे महत्त्व सर्वांना नव्याने जाणवू लागले आहे. झाडांमुळे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच पावसाचे प्रमाण वाढण्यासही हातभार लागतो. मात्र केवळ वृक्षारोपण करून थांबून चालणार नाही, तर त्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी केवळ वन विभाग किंवा प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाने त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायला हवा. नागरिकांचा सहभाग वाढला तर गाव आणि तालुका पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात निश्चितपणे अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.