आपला जिल्हा

जावलीत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी; भाजपकडून ‘कामाचा लेखाजोखा’, राजे गटावर निष्क्रियतेचे गंभीर आरोप..!

जावली (प्रतिनिधी) – ग्रामपंचायतीची मुदत संपताच जावलीतील राजकारण तापले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप–प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे. गावात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून प्रत्येक गट आपापली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे.

भाजपकडून आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा तपशीलवार लेखाजोखा मांडण्यात येत आहे. रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, ग्रामस्वच्छता उपक्रम, सार्वजनिक बांधकामे आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आमच्या कडे सत्ता नसताना ही मागील व चालू वर्षांत गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. कामे कागदावर नाहीत, तर प्रत्यक्षात दिसतात,” असा दावा भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

झेंडे वस्ती डांबरीकरण
निळदरा तलाव रोड मंजूर
पोकळे वाडा चार सौंर लाईटचे दिवे दिले.
खासदार फंडातून समाज मंदिरासमोर हाय मास लाईट उपलब्ध करून दिली
आमदार फंडातून सौर लाईट उपलब्ध करून दिली
हेकळवाडी ठोंबरे वस्ती वॉटर सप्लाय चे पिण्याचे पाणी 2 वर्षापासून बंद असुन फलटण कोरेगाव चे आमदार सचिन कांबळे पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवत स्वखर्चातून 35 हजार रुपये दिले.

शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न

बौद्ध समाजाला समाजा मंदिरा करता निधी मंजूर.
खासदार फंडातून शेतकऱ्यांना दिला डिपी लिंबराज मंदिरा शेजारी

सरकारी दवाखाना मंजूर (जागा उपलब्ध नसल्याने काम रखडले)

जनावरांचा दवाखाना (मंजूर जागा उपलब्ध नाही )

अंगणवाडी मंजूर( जागा उपलब्ध नाही )

दुसरीकडे, राजे गटावर मात्र गंभीर आरोपांची सरबत्ती सुरू झाली आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी “राजे गटाच्या काळात ठोस विकासकामे झालेली नाहीत. ग्रामपंचायतीचे कामकाज प्रभावीपणे राबवण्यात अपयश आले,” असा आरोप केला आहे. “निवडणूक तोंडावर येताच विकासाच्या घोषणा केल्या जात आहेत; मात्र प्रत्यक्ष कामांचा ठसा दिसत नाही,” अशी टीकाही करण्यात आली आहे.

विशेषतः प्रलंबित कामांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. काही महत्त्वाच्या कामांबाबत निर्णय लांबणीवर पडल्याचा आरोप होत असून त्यावरून गावात चर्चा रंगत आहेत. ग्रामस्थांमध्येही दोन्ही बाजूंच्या दाव्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, राजे गटाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. “गावाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून अनेक कामांची प्रक्रिया सुरू आहे. काही कामांना प्रशासकीय कारणांमुळे विलंब झाला असला तरी कामकाज शून्य असल्याचा आरोप निराधार आहे,” असा प्रतिवाद करण्यात आला आहे.

गावातील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलताना दिसत असून प्रत्येक गट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून जावलीत लवकरच प्रचाराचा धुरळा उडण्याची चिन्हे आहेत. आता मतदार कोणावर विश्वास दाखवतात आणि ग्रामपंचायतीची सत्ता कोणाच्या हाती जाते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!