आपला जिल्हा

दहावीची परिक्षा ही अंतिम परिक्षा नसून मुलांना पुढे घेऊन आयुष्याला दिशा देणारा राजमार्ग प्रा.रवींद्र कोकरे

(फलटण/  प्रतिनिधी)- दहावीची परिक्षा ही अंतिम परिक्षा नसून मुलांना पुढे घेऊन आयुष्याला दिशा देणारा राजमार्ग असल्याचे प्रा.रविंद्र कोकरे यांनी मत व्यक्त केले.

प्रा.रविंद्र कोकरे यांच्या मार्गदर्शनाबद्दल माहिती

– दहावीची परिक्षा ही अंतिम परिक्षा नसून आयुष्याला दिशा देणारा राजमार्ग आहे.
– स्वताः ला कमी समजू नका, प्रत्येका मध्ये अदृश्य शक्ती दडलेली असते.
– परस्थितीशी दोन हात करायला शिका.
– सतत २४ तास अभ्यास करणे गरजेचे नाही.
– चितन मनन लेखन वाचन करत मनात जिद्द ठेवा.

– प्रसार माध्यमाच आकर्षण मुळे युवा वर्ग बिघडत चालला आहे अशा गोष्टींचा त्याग करायला शिका.
– तुम्ही अस काही करा की दुनिया तुमच्या माग धावली पाहीजे.
– तुम्हची किंमत बाह्य रंगावून नाही तर अंतरंगा वरुन दिसायला हवी.
– आई वडील शिक्षक आपले शाश्वत मार्गदर्शक दैवत आहेत. त्यांना कमी पणा येईल असे न वागता स्वताःचे चरिञ व चारित्र्य जपा.

विडणी येथिल उत्तरेश्वर हायस्कुल व ज्यु.कॉलेज मध्ये इ.१०वी तील मुलांचा निरोप समारंभात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.यावेळी डॉ.बाळासाहेब शेंडे हणमंतराव अभंग डॉ सुचिता शेंडे राजीव पवार बाळकृष्ण लाड अनिल अब्दागिरे प्रताप पवार शुभांगी शिर्के राजेंद्र आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.कोकरे पुढे म्हणाले की स्वताः ला कमी समजू नका प्रत्येका मध्ये अदृश्य शक्ती दडलेली असते ती ओळखा परस्थितीशी दोन हात करायला शिका.सतत २४ तास अभ्यास करणे गरजेचे नाही.चितन मनन लेखन वाचन करत मनात जिद्द ठेवा यश हमखास तुमच आहे.
प्रसार माध्यमाच आकर्षण मुळे युवा वर्ग बिघडत चालला आहे अशा गोष्टींचा त्याग करायला शिका.तुम्ही अस काही करा की दुनिया तुमच्या माग धावली पाहीजे.तुमची किंमत बाह्य रंगावून नाही तर अंतरंगा वरुन दिसायला हवी.आई वडील शिक्षक आपले शाश्वत मार्गदर्शक दैवत आहेत.त्यांना कमी पणा येईल असे न वागता स्वताःचे चरिञ व चारित्र्य जपा असा मोलाचा सल्ला दिला.
यावेळी डॉ.बाळासाहेब शेंडे प्रताप पवार तसेच १० वीतील मुलांनी मनोगत व्यक्त केली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!