आपला जिल्हा

सह्याद्री कदम यांना चिमणरावजी कदम यांची पुण्याई कामाला येणार

राजे गटाच्या माध्यमातून चिमणरावजी कदम यांच्या कामाची उतराई म्हणूनच सह्याद्री कदम यांना शिवसेनेची उमेदवारी

(फलटण/ प्रतिनिधी) – सन- १०८०- १९९५ अखेर फलटण खंडाळा तालुक्याचे आमदार म्हणून सूर्याजीराव उर्फ चिमणरावजी कदम हे या तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले. याच काळात त्यांना रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष करून कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला तसेच बजेट इस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले.

तत्पूर्वी ११ वर्षे चिमणराव कदम हे फलटण पंचायत समितीचे सभापती २ वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष २० वर्षे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून काम करीत असताना त्यांनी आपल्या अभ्यासू व कर्तुत्वातून या तालुक्यात आपली एक आगळी वेगळी ओळख फलटण तालुक्याच्या राजकारणात व आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधानसभेमधील मुलुख मैदान तोफ म्हणून ते महाराष्ट्रभर सर्वत्र परिचित होते.

विधिमंडळाच्या माध्यमातून त्यांनी या तालुक्यातील दुष्काळी भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम संघर्ष केला.विधानसभेच्या विधिमंडळामध्ये कायम फलटण तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य दिन – दलित कष्टकरी माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले. यामध्ये प्रामुख्याने दुष्काळी भागांमध्ये नाला बंडिंग, पाझर तलाव, के.टी. बंधारे गाव तिथे दवाखाना, एस-टी, रस्ते व पिण्याच्या पाणी अशी अनेक समाज उपयोगी कामे केली.

एक सर्वसामान्य, गरीब – दिनदलित जनतेची कैवारी म्हणून ओळख निर्माण करीत असताना त्यांनी स्वतःभोवती निष्ठावंत स्वखर्चाने त्यांच्या राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज तयार केली होती.त्यांची ही पुण्याई त्यांचे सुपुत्र तथा या तालुक्याचे युवा नेते सह्याद्री भैया कदम हे कोळकी जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवीत असताना सह्याद्री कदम यांच्या कामाला येणार काय असा सवाल जनतेमधून व्यक्त होत असताना दिसत आहे.
आजही फलटण तालुक्यामध्ये चिमणरावजी कदम यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते दिसून येतात त्यामुळे निश्चितच या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सह्याद्री कदम यांना कोळकी जिल्हा परिषद गटातून विजयाचे गणित साकार करण्यास मदत होणार असल्याचे दिसून येत आहे.

आज फलटण तालुक्याची राजकीय परिस्थिती विचित्र होऊन बसली आहे. माजी आमदार चिमणराव कदम यांच्यानंतर या तालुक्याची सूत्रे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्याकडे आली.
यानंतर श्रीमंत रामराजे यांनी या तालुक्यामध्ये जलक्रांती, औद्योगिक क्रांती व शैक्षणिक क्रांती करून या तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, श्रीमंत रघुनाथ
राजे ना. निंबाळकर या तालुक्यांमध्ये चांगला जनसंपर्क ठेवून लोकांच्या अडी-अडचणी समजावून त्या अडीअडचणीवर मात करण्याचाच प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.

त्यांच्या या कामाला कायम चिमरावजी कदम हयात असताना त्यांनी कळत नकळत श्रीमंत रामराजे यांच्या राजकारणाला पूरक भूमिका घेतली असल्याचे दिसून आले. यामागे कारणही तसेच होते. या तालुक्याची सूत्रे एका सुसंस्कृत घराण्याच्या हातामध्ये जावीत व तालुका प्रगतीच्या दिशेने जावा असेच त्यांना नेहमी वाटत होते.

त्यांच्या या भूमिकेमुळेच राजघराण्याने आज सह्याद्री कदम यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे सह्याद्री कदम यांचा विजय निश्चित असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!