आपला जिल्हा
बकरी ईद पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीसांची शांतता समिती बैठक संपन्न


या बैठकीस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार अभिजीत जाधव तसेच पोलीस निरीक्षक अरविंद काळे उपस्थित होते. बैठकीत शांतता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, मोहल्ला कमिटी सदस्य, पत्रकार, गोरक्षक तसेच कत्तलखाना चालक मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान उपस्थितांची मते जाणून घेत बकरी ईद निमित्त सुरू होणारे कत्तलखाने हे नगरपालिकेकडून तात्पुरता परवाना घेऊनच चालवावेत, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच गाय, वासरू किंवा खोंड यांची कत्तल कोणीही करणार नाही, याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.