कृषी व व्यापार
डाळिंब,कांदा व मका भाजीपाला पिकांसाठी नैसर्गिक उपायांचा मंत्र ; आंदरुडमध्ये महिलांचे विशेष प्रशिक्षण


हिला बचत गट, सावित्री महिला बचत गट आणि आदर्श महिला बचत गटातील सदस्यांनी या शेतीशाळेत सहभाग घेतला. डाळिंब शेतीमध्ये रासायनिक औषधांचा खर्च कमी करून विषमुक्त उत्पादन घेण्यासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सतीश हिप्परकर यांनी महाराष्ट्र राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची माहिती देत दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. कडुनिंब, रुई, धोतरा, करंज आदी दहा प्रकारच्या कडू वनस्पतींची पाने व गोमूत्राच्या साहाय्याने नैसर्गिक कीटकनाशक कसे तयार करावे, त्याचा डाळिंब, भाजीपाला व कडधान्य पिकांमध्ये कसा वापर करावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच जीवामृत तयार करण्याची प्रक्रिया व त्याचे फायदेही उपस्थितांना समजावून सांगितले.
सहाय्यक कृषी अधिकारी संजय करचे यांनी डाळिंब बागेतील हुमणी व वाळवी या किडींच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळे, पक्षी थांबे, रोमन ट्रॅप, मेटारायझियम बुरशी आणि निंबोळी पेंड यांचा वापर करून रसायनमुक्त नियंत्रणाच्या उपाययोजनांची माहिती दिली.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.