आपला जिल्हाताज्या घडामोडी
साधेपणा, धम्म आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश : कालकथित किसाबाई जगन्नाथ कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिन


यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयु. महावीर भालेराव म्हणाले की, बौद्ध धम्म हा नीतिमान, निर्मळ व विवेकपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग आहे. आपल्या पूर्वजांच्या, आप्तेष्टांच्या व कुटुंबीयांच्या स्मृती जतन करण्यासाठी स्मृतिस्थळे निर्माण व्हावीत. त्याचबरोबर त्या परिसरात पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या वृक्षांचे, विशेषतः बोधीवृक्षाचे रोपण करून गेलेल्या व्यक्तींच्या आठवणी जपल्या पाहिजेत.
ते पुढे म्हणाले की, “मनुष्य आपल्या कुशल कर्मांमुळेच समाजात स्मरणात राहतो. त्यामुळे प्रत्येकाने बौद्ध धम्माच्या आचरणासह पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”त्यांनी कालकथित किसाबाई यांच्या कष्टमय जीवनावर प्रकाश टाकत, त्यांनी अपार कष्टातून आपल्या नऊ मुलांचा सांभाळ केला असल्याचे सांगितले. तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाची आणि किसाबाई यांच्या संघर्षमय जीवनाची तुलना करत दोघींच्या कष्टमय जीवनातील साम्य अधोरेखित केले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.