महाराष्ट्र
रक्त, राख आणि संविधान : मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा संघर्ष

(सोमिनाथ घोरपडे /प्रतिनिधी )हा फक्त इतिहास नाही-ही निष्ठेची, त्यागाची आणि आत्मसन्मानाची गाथा आहे.! मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाला आज ३२ वर्षे पूर्ण झाली असली, तरी मराठवाड्यातील त्या संघर्षाच्या जखमा आजही ताज्याच आहेत. या ऐतिहासिक लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना विनम्र अभिवादन..!
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या व्यापक घटनाक्रमाकडे जाण्यापूर्वी, या संघर्षाशी निगडित फलटण तालुक्यात घडलेल्या घडामोडींचा मागोवा घेणे आवश्यक ठरते.फलटण तालुक्यातील मंगळवार पेठ हे आंबेडकरी चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. तालुक्यात कुठेही अन्याय-अत्याचार झाला की आंबेडकरी बांधव मंगळवार पेठेतील कार्यकर्त्यांकडे धाव घेतात ही परंपरा आजही कायम आहे. आंबेडकरी चळवळ कधीच थांबलेली नाही.
आयु.सोमीनाथ पोपट घोरपडे, सामाजिक कार्यकर्ता
संस्कार सचिव, भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व
मोबाईल नंबर – 9284658690
नामांतराचा लढा मराठवाड्यात तीव्र होत असताना अन्याय-अत्याचार शिगेला पोहोचले होते. हा लढा केवळ मागणीपुरता न राहता, अस्मितेचा संघर्ष बनला होता. नामांतरासाठी आयोजित सभांना व परिषदांना लोक ट्रक भरून जात होते. या आंदोलनासाठी सर्वाधिक वाहने फलटण तालुक्यातून जात असत.या पार्श्वभूमीवर नामांतर कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर होते. समितीत आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. नामांतर कृती समितीच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणाचा भाग म्हणून संपूर्ण मंगळवार पेठेने एक दिवस ‘चूल बंद’ आंदोलन यशस्वीपणे राबवले.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळाल्यानंतर तत्कालीन राजकीय नेते कै. सुभाष शिंदे (सुभाषभाऊ) यांनी आपल्या बंगल्यावर सर्व कार्यकर्त्यांना तिळगुळ आणि गुलाबपुष्प देऊन आनंद साजरा केला. फलटण तालुक्यातील आंबेडकरी समाजाच्या प्रत्येक आंदोलनात ते नेहमीच अग्रभागी राहिले.



