हि बातमी ईतर भाषेत वाचा
कृषी व व्यापार

जावली आठवडे बाजारातील मर्क्युरी बंद पडल्याने बाजार तळा अंधारमय ; ग्रामपंचायत दुर्लक्ष ; परिसर स्वच्छतेची मागणी

(जावली/ अजिंक्य आढाव)- जावली ता फलटण येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात मर्क्युरी बंद पडल्याने बाजार तळावर होतोय अंधार, गेले अकरा वर्षांपासून बाजार भरतो. बाजारासाठी फलटण, बरड , गुणवरे , नातेपुते, आंदरुड,मिरढे व परिसरातील व्यापारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात.

प्रत्येकी दुकानदारांकडून दहा रुपयांची पावती ; यंदा पाऊस पडल्याने बाजारात भाजी पाला विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी

गेल्या दोन महिन्यांपासून मर्क्युरी बंद पडल्याने बाजार अंधारात भरतो यामुळे व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

याबरोबरच बाजार तळावर गवत वाढल्याने अडचण निर्माण होत आहे. फलटण – शिखर शिंगणापूर रोड लगत हा बाजार असल्याने येणारे भाविक भाजी पाला व किराणा साहित्य खरेदीसाठी गर्दी करतात अशातच लाईट नसल्याने व्यापारांचे नुकसान होत असुन दुरुस्तीची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!