(जावली/ अजिंक्य आढाव)- जोगेश्वरी सिद्धनाथ विवाह सोहळा नंतर एक दिवसाआड भाकड दिवस असल्याने कमी प्रमाणात भाविकांची संख्या होती मात्र जावल सिद्धनाथ बकरी आणि बगाड एकाच दिवशी आल्याने यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.मानची बकरी कापल्यानंतर , मानकरी बगाड घेण्यासाठी रांगेत उभे होते.
वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात
शिखर शिंगणापूर कडे जाणारा रस्ता एक पदरी असल्याने सतत वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत होती.यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्व सामान्य नागरिकांना झळा सोसाव्या लागत आहेत.बकऱ्याचा दिवस असल्याने नवस फेडण्यासाठी बकरी कापली जातात.व पै पाहुण्यांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते.यावेळी ग्रामपचांयत कडून टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर उन्हात भाविक भक्त बगाड घेण्यासाठी रात्री पासूनच रांगेत उभे होते.
यात्रेसाठी कर्नाटक, मुंबई, पुणे,व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.या बरोबरच उद्या जावल सिद्धनाथ यात्रेचा छबिना असल्याने भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे.