(म्हसवड/ प्रतिनिधी) – माण तालुक्यातील जांभुळणी नजीक असलेल्या लाडेवाडी येथील सुखदेव धर्मू खताळ व सरगर आणि चिलारेवाडी येथील दादा नामदेव गोरड यांच्या वाड्यातील ८ मेंढ्या आणि लाडेवाडी यांच्या मेंढपाळाच्या वाड्यावर लांडग्याच्या कळपाने हल्ला केल्याने १९ मेंढ्यांच्या पिलांसह ११ मेढ्या चार शेळ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या लांडग्यांच्या हल्ल्यामुळे मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी वन विभागाने या लांडग्यांचा बंदोबस्त करुन नुकसान ग्रस्त मेंढपाळ यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी धनगर समाजाचे नेते डॉ. प्रमोद गावडे यांनी केली आहे.
लाडेवाडी ता. माण शिवारामध्ये मेंढपाळ सुखदेव खताळ व सरगर यांचा मेंढ्यांचा वाडा आहे. खताळ मेंढ्या चरायला घेऊन गेले असता दुपारच्या वेळी लांडग्याच्या कळपाने वाड्यावर असलेल्या १९ पिलांवर हल्ला केला. त्या हल्ल्यात १९ कोकरं मृत्यूमुखी पडले आहेत यामुळे मेंढपाळाचे प्रचंड नुकसान झाले आहे
चिलारेवाडी येथील दादा नामदेव गोरड यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर गेल्या दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी लांडग्यांचा हल्ला करुन ९ मेंढराचा मृत्यू झाला सदर तिन्ही घटनेचा वन विभागाने पंचनामा करून तात्काळ नुकसान ग्रस्त मेंढपाळ यांना मदत करावी.