हि बातमी ईतर भाषेत वाचा
माहिती व तंत्रज्ञान

म्हसवडला पाणी पुरवठा १५ दिवसातून एक वेळ , पालिका प्रशासन कोणाच्या सांगण्यावरुन म्हसवडकरांना त्रास देत आहेत ; कोण खरा सुत्रधार..?

ज्यांच्या हाती कारभार तेच पाणी टंचाईला जबाबदार असतात पाण्याचे आंदोलन करण्याची भाषा म्हणजे हश्यास्पद असून यापूर्वी पाण्यासाठी आंदोलने झाली ती आंदोलने मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणारेच आंदोलन करण्याचे इशारे देवू लागले आहेत

(म्हसवड /प्रतिनिधी) – म्हसवडचा पाणी पुरवठा हेच खरे म्हसवडचे दुखणे असून आज २७ वर्षापूर्वी ४ फुट खड्यातुन म्हसवडची जनता पाणी भर होती २४ वर्षापूर्वी जिवन प्राधिकरणाची योजना सुरू झाल्यापासून कमीत कमी सहा ते आठ दिवसांनी पाणी शहरात पाणी पुरवठा होत होता मग उन्हाळा असो वा पावसाळा काहीच फरक पडला नाही वा प्रशासक महाशयांनी , सत्तेवर असलेल्या सत्ताधारी वा पालिकेच्या इंजिनियर यांनी कधी या योजनेकडे म्हसवडचे आसून हि लक्ष दिले नाही लक्ष केले सर्वानीच ते फक्त आपले कमिशन कसे मिळेल म्हसवडच्या जनतेच्या प्रश्नाचे या कोणाला कसलेच देणे नाही फक्त त्यांना एकच माहिती घेणे आॅक्टोबर मध्ये उरमोडीच्या पाण्याने तिन महिने तारले हे पुढे पाणी टंचाई होणार आहे हे माहीत असून हि कसलीच हालचाल का केली नाही सध्या नवीन पाणी योजनेची वाडी वस्तीवर पाईप टाकण्याचे काम तिन महिन्यापासून सुरू आहे त्याच्या ऐवजी नवीन पाणी योजनेची नवीन मेन लाइनची पाईप इस्लामपूर ते तारखेला फिल्टर टॅक पर्यंत टाकली असतील तर म्हसवड व परिसरातील जनतेला रोज पाणी मिळाले असते मात्र प्रशासक साहेबांना काम का करायचे नव्हते म्हसवडच्या जनतेला त्रास कोणाच्या सांगण्यावरुन देत आहेत कोण पोळी भाजत आहे या मागील खरा सुत्रधार कोण प्रशासक साहेब असा सवाल म्हसवडकर जनता करत आहे.

यापूर्वी पाण्यासाठी दोन आंदोलन झाली मात्र त्या आंदोलनाला मोजकेच नागरीक सहभागी झाले होते म्हसवडच्या जनतेला गांभिर्य केव्हा येणार मुळासकट ऊस अधिकारी यांनी खालल्यावर जागी होणार का प्रत्येक गोष्टीत राजकारण नागरीक पहातो त्या मुळेच म्हसवडची हि अवस्था निर्माण झाली आहे

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कमी पाऊस झाला असला तरी महाराष्ट्रात कोणत्याही नगरपालिका हद्दीत १५ दिवसांनी पाणी पुरवठा होत नसेल पण हे म्हसवड नगरपालिकेच्या हद्दीत अडीच वर्षापासून पालिकेत प्रशासकीय राजवट असताना वास्तविक पाहता म्हसवडची पाणी टंचाई हि नवी नाही कधी चार, सहा, आठ दिवसांनी पाणी पुरवठा होत होता जास्तीत जास्त लवकर पाणी पुरवठा करण्यासाठी तिन पालिकेच्या मालकीच्या विहिर , एक खाजगी विहीर व जिवन प्राधीकरणाची एक पाणी योजना असताना २४ वर्षात कधी ही१५ दिवसांनी पाणी पुरवठा झाला नाही वा टँकरने पाणी शहरात वाटण्याची वेळ ज्या त्या वेळच्या सत्ताधारी व प्रशासक, मुख्याधिकारी यांनी काळजी घेतली होती मग सध्याच्या प्रशासक महाशय डॉ सचिन माने यांना म्हसवडची पाणी टंचाई माहित नाही का, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण म्हसवडच्या नागरीकांना त्रास देण्याचे काम करतात कि प्रशासक माने कोणाच्या सांगण्यावरून पालिकेचा गाढा ओढत आहेत.  पाण्याची ती बोंब, विकास कामाचे तिन तेरा  अतिक्रमण वाढ, अनाधिकृत बांधकामे, नवीन पाणी योजनेच्या पाईप कामासह अनेक कामात भ्रष्टाचाराचा सुंगध म्हसवड परिसरात दरवळत आहे याचा खरा सुत्रधार कोण शहरात सध्या १५ दिवसांतुन एकवेळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पालिकेकडुन होवु लागल्याने नागरीकांतुन तीव्र संताप व्यक्त होत असुन चार ते पाच महिन्यापूर्वी अशीच मोठी पाणी टंचाई होण्याचे संकेत मिळत असताना उरमोडी प्रकल्पाचे आवर्तन शेंबडेवस्तीच्या माणदेशी बांधलेल्या बंधारा भरे पर्यंत पाणी सोडले यामुळे या बंधारार्यालगत असलेल्या पालिकेच्या विहीरीला पाणी फुटल्याने म्हसवड शहर चार दिवसातून एकवेळ डिंसेबर पर्यंत मिळत होते तर इस्लामपूरची पाणी योजनेच्या साठवण टॅक मध्ये सहा महिने म्हसवडची जनतेला तीन दिवसांनी एकदा मिळेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे फक्त या योजनेची मेन पाईप गंजल्याने दिवसातुन दोन वेळा पाईप फुटते किंवा लिकीज होत असल्याने शहराला पाणी टंचाई होत आहे शेंबडेवस्तीवरील विहीरीचे पाणी लवकरच संपणार आहे हे पालिकेची एक हाती कारभार करणारे प्रशासक साहेबा यांना माहीत असताना हि पाणी टंचाईची उपाय योजना करण्यापेक्षा लोकांची पालिके विषयी कशी बोंबाबोंब होईल याकडे लक्ष फक्त प्रशासक साहेब लक्ष देतात ते कोणाच्या सांगण्यावरुन या मागील खरा सुत्रधार कोण ? प्रशासक साहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हसवडच्या जनतेला त्रास देण्याचे काम कोण करतंय असे म्हसवडचे अनेक प्रश्न या पाणी टंचाई मुळे पूढे येत आहेत याला प्रशासक साहेब जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!