हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र

जावली परिसरात पाणी टंचाईच्या झळा ; धोम बलकवडी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी फलटण तहसीलदारांना निवेदन

(जावली/ अजिंक्य आढाव) – दुष्काळाची दाहकता जाणवत  असताना फलटण पूर्व भागात जावली सह परिसरातील गावांना पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून  धोम बलकवडी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी फलटण तहसीलदार यांना निवेदनाद्वारे  करण्यात आली.

फलटण पूर्व भागात जावली सह परिसरातील पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई सदृश्य परिस्थिती परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामपंचायतच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीमध्ये सध्या चार दिवस पुरेल एवढे पाणी साठा उपलब्ध असुन धोम बलकवडी कॅनाॅलला पाणी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या वेळी जावली ग्रामस्थ आनंदराव निंबाळकर, माजी सरपंच सयाजी बरकडे, ज्ञानदेव बुधावले, सचिन मकर , सत्यवान चवरे, श्रीरंग निंबाळकर, समीर आतार , फैय्याज शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!