हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर अडवून मारहाण प्रकरणी ; 12 जणां विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

(जावली/अजिंक्य आढाव) – राजुरी ता. फलटण येथील साधूबुवा मंगल कार्यालया जवळ दि. 20 रोजी रात्री 8 वाजता उपळवे येथील स्वराज साखर कारखान्याला निघालेल्या ऊसाच्या दोन ट्रॉली अडवले प्रकरणी सुमारे 12 जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आहे. या बाबत पोपट विठोबा गावडे (वय 75 राहणार गुणवरे ता. फलटण ) यांनी फिर्याद दिली आहे.

साधू बुवा मंगल कार्यालय राजुरी ता फलटण जि. सातारा येथील धनंजय बाळासो ठणके,गणेश शिवाजी साळुंखे , नितीन भानुदास संजय दशरथ साळुंखे , सचिन वाघमोडे सर्व राहणार मुंजवडी ता. फलटण सुधाकर दामू माळवे ,संभाजी गाडगे, किरण पवार, वैभव गावडे, राजू माळवे , चंदू इंगळे , नामदेव खटके सर्व राहणार राजुरी ता. फलटण यांनी साधू बुवा मंगल कार्यालय राजुरी तालुका फलटण गावचे हद्दीत फिर्यादी ने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या ताब्यातील जॉईनडर कंपनीचा ट्रॅक्टर नंबर एम एच 11 – 7601 या बरोबर उसाची दोन ट्रॉली माळशिरस येथून उपळवे या ठिकाणी स्वराज कारखान्यात निघाले असताना “तुला माहित आहे ना” दरवाढीसाठी ऊस वाहतूक बंद आंदोलन सुरू आहे तरी तू ऊस वाहतूक का करतोस असे म्हणून सदर इसमनी बेकायदा जमाव जमवून मला शिवीगाळ व काठीने व दगडाने,  लाथाबुक्क्यांनी  मारहाण केली अशी माहिती दिली आहे.

अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार चांगण करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!