(जावली/अजिंक्य आढाव) फलटण पूर्व भागात दलालांकडून पशुपालकांना अधिक रकमेचे आमिष दाखवून जनावरे विकत घेतली जात आहेत.शेतकरी दुष्काळाच्या भीतीने विकत असल्याचे दिसत आहे.यातच यंदा पावसाने नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. याचाच फायदा घेऊन जनावरांचे एंजेट दररोज गावागावात वाड्यावर स्त्यावरं फिरून शेतकऱ्यांकडून जनावरे विकत घेऊन पुढे कसाई कडे कत्तली साठी दिली जात आहेत.
मागील काही दिवसापूर्वी फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी या भागात बैठक घेऊन या ठिकाणी गो तस्करी व गो हत्या करणाऱ्या संबंधितांना आवाहन करून या व्यवसायातून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते मात्र पैशासाठी हपापलेल्या या लोकांनी त्यांच्या आवाहनाला फासला हरताळ गेल्याचे चित्र दिसुन येतं आहे.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आता ऐरणीवर असताना चारा डेपो किंवा छावणी सुरू कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
कत्तलीसाठी देणाऱ्या दलालवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही पशु पालकांकडून होतं आहे