ताज्या घडामोडी
श्रद्धेने केलेली भक्ती श्रेष्ठ असते ,अंधश्रद्धेच्या आहारी न जाता स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा – प्रा.रवीद्रं कोकरे
"आदिमाया शक्तीचा जागर" - काबंळेश्वर येथे व्याख्यानमालेचे आयोजन
![](https://parishramnews.in/wp-content/uploads/2023/10/IMG-20231022-WA0038-780x470.jpg)
(गोखळी/ प्रतिनिधी)”बाह्यरंगी , अंतरंगी अखंड माणुसकीची भावना जपणे. सकारात्मक ऊर्जेत रोजचे जगणं असावे. तरुणाईनं ध्येयासाठी केलेली वाटचाल आदिमाया शक्तीचं खरं रुप आहे. तुझं माझं न करता सर्वस्व भगवंताच देणं आहे,” असा वैचारिक उपदेश कथाकार,प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी व्यक्त केला.
कुलस्वामिनी भिवाईमाता व्याख्यानमाला कांबळेश्वर(फलटण) आयोजित “आदिमाया शक्तीचा जागर” या विषयावर पुष्प गुंफताना कोकरे बोलत होते. भिवाई देवस्थानचे पदाधिकारी,पुजारी,सेवक,घडशी,महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्त , महिला वर्ग उपस्थित होता.
प्रा. रवींद्र कोकरे यांनी “श्रद्धेने केलेली भक्ती श्रेष्ठ असते. अंधश्रद्धेच्या आहारी न जाता स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. ओटी भरताना पुस्तक दान करा. देवीच्या मंदिराभवती हिरवीगार वनराई निर्माण करा. मुलांच्या भवितव्यांकडे लक्ष द्या.अन्नदानाबरोबर ज्ञानदान ही करावे.” असा मोलाचा उपदेश केला.