ताज्या घडामोडी
पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून वनराई बंधारे बांधणे काळाची गरज – मंडल कृषी अधिकारी अशोक नाळे
![](https://parishramnews.in/wp-content/uploads/2023/10/IMG-20231010-WA00351-780x470.jpg)
(जावली/अजिंक्य आढाव) – भारत देश हा खेड्यांचा देश आहे, आणि देशातील काही ग्रामीण भागातील शेती पावसावर अवलंबून आहे.म्हणुन पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून वनराई बंधारे बांधणे काळाची गरज असल्याचे महत्व मंडल कृषी अधिकारी अशोक नाळे यांनी सांगितले.
![](https://parishramnews.in/wp-content/uploads/2023/10/IMG-20231010-WA00341-300x169.jpg)
पाणी अडवा पाणी जिरवा’ हि आजच्या काळात खूप महत्वाची गरज आहे. सध्याच्या काळात पिण्याचे पाणी खूपच कमी कमी होत चाले आहे, याचे कारण म्हणजे आधुनिक काळात होत असलेली झाडांची कत्ल आणि वाढते ग्लोबल वार्मिंग या सर्व गोष्टींचा आपल्या पर्यावरणावर घातक परिणाम होत आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा हि संकल्पना राबवणे खूप म्हत्वाचे आहे. – कृषी सहाय्यक सतीश हिप्परकर