(जावली/ अजिंक्य आढाव)- फलटण पूर्व भागातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेता, सध्या पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून वनविभाग फलटण व अर्थ फाऊंडेशनच्या वतीने वनपरिक्षेत्रात वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.
भविष्यातील पाणी संकट परिसरावर येऊ नये , या साठी आजच वाहणारे पाणी थांबवून ते जमिनीत मुरणे गरजेचे आहे , याचा फायदा जलपातळी वाढ होवुन विहिरी कूपनलिका यांची जलपातळी सुधारते.
श्रीमती आदिती भारद्वाज उप वनसंरक्षक सातारा व श्रीमती रेश्मा व्होरकाटे सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सचिन रघतवान यांच्या सूचनेनुसार वनराई बंधाऱ्यांची निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. वनराई बंधारे हे ज्या भागामध्ये पाणी पातळी खोलवर गेली आहे, जेथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते त्या भागामध्ये अशा प्रकारे बंधाऱ्यांची निर्मिती करुन पाणी अडवून जीरवले तर पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते म्हणूनच वनराई बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे असे फलटण वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सचिन रघतवान यांनी सांगितले,अशा पद्धतीची निसर्ग संवर्धनाची कामे लोकसहभागातून आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने फलटण वनविभाग मोठ्या प्रमाणात हाती घेणार असल्याचे श्री रघतवान यांनी यावेळी सांगितले.
या विभागाचे वनपाल श्री राजेंद्र कुंभार व नियत क्षेत्र अधिकारी श्री राहुल निकम हे ग्लोबल अर्थ फाउंडेशन चे संस्थापक सचिन जाधव,अभिजीत नाळे , मंगेश कर्वे यांच्या वन्यजीव संरक्षण आणि निसर्ग संवर्धना मधे अग्रेसर असलेल्या संस्थेच्या मदतीने चांगल्या पद्धतीचे वनराई बंधारे बांधण्याचे काम करत आहेत.
या वेळी संस्थेचे सदस्य आणि फलटण वनविभागाचे वन मजूर यांच्या मदतीने काम करण्यात आले.