हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

कांद्यावर कर बसवून सरकार ला शेतकरी संपवायचा आहे का..? सर्वसामान्य,गोरगरीबांचे सरकार आणण्यासाठी सामुदायिक ताकत उभी करायची आहे -शरदचंद्र पवार

पाच जेसीबीच्या सहाय्याने पवार साहेबांच्या गाडीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला तर मोठ्या पोकल्यानेच्या सहाय्याने 12 फुटाचा 150 किलो वजनाचा हार पवार साहेबांच्या गाडीला घालण्यात आला

सभेदरम्यान कुकुडवाड गटातील युवक ,ज्येष्ठांनी दहिवडी सभेचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश युवक सर चिटणीस अभयसिंह जगताप व राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष विक्रम शिंगाडे सभास्थळी तब्बल २००हून अधिक गाड्यांचा ताफ्यासह . पवार साहेब आगे बढो च्या घोषणांनी सभा स्थळ दाखल झाले म्हसवड शहरातून ही युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष परेश शेठ व्होरा, तेजसिंह राजेमाने, किशोर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड शहरातून ही युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हसवड परिसर व कुकुडवाड गटातील युवकांचा उत्साह हा वाखाणण्याजोगा असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या

(एल. के. सरतापे.म्हसवड)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज माण मध्ये आले. दहिवडी मध्ये शरद पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडानंतरची शरद पवार यांची माण मधली ही पहिलीच सभा होती. शरद पवार आजच्या सभेत काय बोलतात? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता होती. कारण शरद पवार मागच्या आठवड्यात त्यांचे पुतणे अजित पवार यांना भेटले होते. त्यावरुन मोठ्या प्रमाणावर शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल राजकीय संभ्रम निर्माण करण्यात आला. त्यामुळे शरद पवार काय बोलणार….? याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलं होतं.

दहिवडी येथील सभेच्या निमित्ताने उपस्थीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, खा श्रीनिवास पाटील,आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहीत पवार , सुनिल माने,माण खटाव चे नेते प्रभाकर देशमुख, सारंग पाटील, राजकुमार पाटील, अभयसिंह जगताप, दहिवडी नगराध्यक्ष

माण तालुक्याच्या हद्दीवर मोगराळे घाटमाथ्यावर हजारो युवकांसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या फटाक्यांच्या व घोषणाबाजीत साहेबांचे जंगी स्वागत प्रभाकर देशमुख, मनोज पोळ, श्रीराम पाटील, अभयसिंह जगताप सह हजारो कार्यकर्त्यांनी केले

सागर पोळ, नगरसेवक सुरेंद्र मोरे ,  महेश आढाव,पृथ्वीराज गोडसे, बंडू कोकरे,तेजस शिंदे राहुल सागर,अभय सिंह जगताप, दीपक पवार, मनोज पोळ, विक्रम शिंगाडे, हणमंत पाटील, शहाजी बाबर,, सातारा जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष सुरेश जाधव,माण काँगेस चे अध्यक्ष, बाबासाहेब माने, विश्वंभर बाबर, दिलीप तुपे,मनोज कुंभार, नगराध्यक्ष सागर पोळ, सुभाष शिंदे, हर्षदा देशमुख, राष्ट्र वादी माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जय राजेमाने यांच्यासहित वडूज , दहिवडी चे नगरसेवक युवक पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

राष्ट्रवादी फुटी नंतर प्रथमच माण तालुक्यात आलेल्या पवार साहेबांच्या स्वागताला व सभेला आज पर्यंतचे या पटांगणाच्या रेकार्ड ब्रेक गर्दी करण्यात देशमुख साहेब यशस्वी झाल्याची चर्चा सभा स्थळी होती

उपस्थितांशी बोलतांना शरद पवार म्हणाले की “यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांशी बांधील असणाऱ्या माण खटाव मधील नागरिकांच्या व्यथा ऐकण्यासाठी या ठिकाणी आलो असून दुष्काळ ग्रस्थांचे अश्रू पुसायला सध्या या सरकारकडे वेळ नाहीं.. ही लक्षणे महाराष्ट्रातील शेतकरी कष्ट कऱ्यांच्या दृष्टीने चांगली नाहीत. कांद्यावर कर बसवून सरकार ला शेतकरी संपवायचे आहेत. सर्व सामान्य, गोर गरीबांचे सरकार या देशात स्थापन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

प्रसांगी सध्याच्या सरकार विरोधात संघर्ष करावा लागला तरी तो करू. . मणिपूर, नागालँड प्रांतात माणसा माणसात संघर्ष सुरु आहे. या देशात महिलांची धिंड काढली जाते. माञ केन्द्र सरकार बघ्याची भुमिका घेतेय. राज्या राज्यात संघर्ष सुरु आहे. चीन लगतची राज्ये आज ही सुरक्षित नाहीत. प्रचंड हिंसाचार सुरु आहे. इथून पुढचा काळ एकजुटीने राहुन राज्यासह देशात आपणाला सत्ता बदल करणे गरजेचे आहे. सामुदायिक ताकद उभी केली तर आपणाला कोणीही रोखू शकत नाही. आपली शक्ती मजबूत ठेऊया, आणि दाखवू या की हे राज्य यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले, बाबसाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं असून आपण राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहाल.
प्रभाकर देशमुख म्हणाले की, शिक्षणं समाजकारण याला नेहमी प्राधान्य देणारे देशाचे जाणते शरद चंद्र जी पवार साहेब यांच्या हस्ते ५०० सायकल वाटप त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन, दहिवडी नगरपंचायत इमारत उद्घाटनाप्रसंगी  राष्ट्रवादी पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांची उपस्थिती हीच पवार साहेबांची ताकद असून पवार साहेबांच्या विचारांचा बालेकिल्ला म्हणुन माण सह खटाव ची ओळख आहे. या भागांतील जनता खोट्या आश्वासनाला भुलनारी नसून केवळ पवार साहेबांच्या मुळेच पानी योजना कार्यान्वित झाल्या. सदाशिव तात्या, भाऊसाहेब गुदगे, यशवंत माने या मंडळींनी पाणी योजनेसाठी परिश्रम घेतले. माञ आयत्या पिठावर रेघोट्या मारू पाहणाऱ्यांनी पाणी योजनेचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न जनतेने चांगलाच ओळखला आहे.२००९पासून आजपर्यंत एक ही थेंबाचे नियोजन केलं नाही.

यावेळी आ. रोहीत पवार, आ शशिकांत शिंदे,आ. बाळासाहेब पाटील, मा. राज्यपाल श्री निवास पाटिल यांनी मनोगते व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!