(जावली/अजिंक्य आढाव)- महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी फलटण व मंडळ कृषी अधिकारी बरड यांचे मार्गदर्शन खाली कृषी संजीवनी पंधरवडा मौजे जावली येथे साजरा करण्यात आला.
दि १९ जुन रोजी सकाळी १० वा.साजरा करण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी , ग्रामस्थ उपस्थितीत होते. सदर वेळी मंडळ कृषी अधिकार बरड अशोक नाळे यांनी कृषी संजीवनी पंधरवडा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कृषी संजीवनी पंधरवडा हा डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून १७जुन ते १ जुलै या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.सदर कार्यक्रमाची सांगता 1जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे.या मध्ये बिजप्रक्रिया जनजागृती मोहीम, पि.एम.किसान उत्सव दिवस ,जमिन सुपिकता जागृती दिन बाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थितीत शेतकरी मित्रांना करण्यात आले.कृषी सहाय्यक सतीश हिप्परकर यांनी, खरीप हंगाम मका शेतीशाळा वर्ग क्रमांक २ चे आयोजन करून
,एकात्मिक मका पीक लागवड व पीक उत्पादन , एकात्मिक बाजरी पीक लागवड व पीक उत्पादन ,फळबाग लागवड बांबु लागवड ,माती परीक्षण पिक विमा व शेतकरी विमा योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या वेळी १०० शेतकरी मित्रांना सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांचे उपस्थित मोफत बाजरी प्रकल्प बियाणे वाटप करण्यात आले.