(जावली /अजिंक्य आढाव)- कधी काळी प्रवासात एखादी पाण्याची बाटली विकत घेणाऱ्या नागरिक आता असह्य उन्हाळ्यामुळे थंड पाण्याची तहान भागवण्यासाठी वापर करु लागले आहेत.यातच नव्याने शिखर शिंगणापूर रोड लगत थंड पाण्याचे एटीएम असल्याने तहान भागवण्यासाठी थंड पाण्याचे वापर नागरिक करीत आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा व्यवसाय उभा केला,मात्र जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर किशोर आणि कुमार यांनी हा व्यवसाय उभा केला सध्या भरघोस प्रतिसाद मिळातो आहे .
या बरोबरच प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्यायोग्य जार गावोगावी तसेच शुभ कार्यात वापर जास्त प्रमाणात वाढला आहे.अशातच जावली गावचे युवा उद्योजक किशोर करे आणि कुमार अवघडे यांनी नव्याने या व्यवसायात वाटचाल करत शिंगणापूर रोड लगत व गावातील लिंबराज रोड लगत शुद्ध पाण्याचा अक्वा एटीएम सुरू केला आहे.बाहेर गावातील नागरिकांना सोईस्कर ठरु लागला आहे.
सध्या यात्रा हंगामा सुरू असुन प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळताना दिसतो आहे.