(जावली/अजिंक्य आढाव) ट्रान्सफॉर्मर चोरी प्रतिबंध साठी भिलकती कांबळेश्वर वडजल वाठार निंबाळकर , निंभोरे ,सुरवाडी फडतरवाडी, काशीदवाडी या गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील यांची बैठक आयोजित केली होती.
ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्फत जर डीपी ट्रिप होऊन रात्री परत चालू झाला हे सब स्टेशनला समजते त्यांनी जर ग्रामसुरक्षा यंत्रणा हेल्प लाइन वरून कॉल दिला तर ग्रामस्थांना कॉल जाईल व डीपी चोर पकडले जाऊ शकतात.या प्रकारे एक महिने पासून पोलिस ने कारवाई केली असता डीपी चोरी घट दिसून आली.
परंतु काही गावे ही यंत्रणा राबविण्यास अनुभवही आहेत म्हणजे त्यांना सुरक्षा हा विषय कमी महत्वाचा वाटतो म्हणून त्यांन समुपदेशन साठी बैठक बोलावली होती या गावचे बैठक बोलावणेचे करण हीच गावे डीपी चोरीत बाधित आहेत फलटण तालुक्यातील ८० टक्के घटना या गावात आहेत तरी या गावातील लोकांनी सहकार्य करावे महनून बैठक बोलावली होती.सर्वात जास्त घटना भिलकती वडजल सूरवाडी गावचे असून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन बैठकीस अनुपस्तीत होते.
महावितरण सुद्धा डीपी चोरी उपाय योजने साठी संवेदनशील दिसून येत नाही ग्रामसुरक्षा यंत्रणेचे गोरडे यांचेशी त्यांचे संपर्क करून सब स्टेशन चे ऑपरेटर चा नंबर या यंत्रणेत घेणे बाबत पाठपुरावा केला होता त्यप्रमाणे त्यांनी नंबर घेतले होते परंतु पुढे त्यांची समन्वय न झालेने ते सुद्धा नंबर ग्रामसुरक्षा यंत्रणेने काढून टाकले आहेत या बैठकीत तो सुद्धा समन्वय ग्रामसुरक्षा यंत्रणा महावितरण व गावकरी यांचा करणेचा प्रयत्न केला.
पोलीस यंत्रणा कमी असलेने व दुर्गम भागातील डीपी पोलीस ला रात्री उशिरा टॉपोग्राफी व डीपी लोकेशन माहीत नसलेने सापडत नाही या साठी महावितरण व ग्रामस्यांथाचे सहकार्य लाभले तर नक्की डीपी चोरी थांबेल फक्त संवेदनशील तेथे सगळेने राहणे आवशक आहे.