गोखळी (प्रतिनिधी): अत्यंत खडतर प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आपल्या मुलांना घडविण्याचे काम केले असा मातांना जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे हनुमान माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि गोखळी ग्रामस्थांच्यावतीने आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले , हनुमान विद्यालयाच्या प्रांगणात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोखळी माजी सरपंच सुमनताई गावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी सौ गुरव मॅडम उपस्थित होत्या. प्रारंभी श्री.सरस्वतीच्या फोटोचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना बजरंग गावडे म्हणाले की, आपल्या देशाला कर्तुत्वान महिलांची परंपरा आहे राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले झाशीची राणी इंदिरा गांधी अशा थोर कर्तुत्वान महिलांच्या परंपरेत वाढलेल्या मातांनी आपल्या मुलांना सुसंस्कृती त सुसंस्कारित बनवून त्यांच्यावर चांगले संस्कार करुन घडविले असा आदर्श मातांचा हनुमान विद्यालयाच्या संकल्पनेतून होत आहे या संकल्पनेबद्दल धन्यवाद दिले, यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ ए एस.गुरव मॅडम, तानाजी बापू गावडे, नंदकुमार गावडे,सौ.वैशालीताई गावडे -कोकणे , प्राचार्य सुनील सस्ते सर,मोहन ननवरे सर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास उपसरपंच सौ.वैशाली कोकणे-गावडे. सौ. मनीषा गावडे.सौ.अर्चना चव्हाण. सौ.स्वाती खरतोडे ,सौ शुभांगी भोसले- बोंद्रे , सौ.स्वाती भगत , बजरंग गावडे, प्राचार्य सुनील सस्ते, तानाजी बापू गावडे, मनोज तात्या गावडे, अमित भैया गावडे, अभिजीत जगताप, काशिनाथ गावडे, आकाश खटके, बंडू यादव,नंदकुमार गावडे, डॉ अमित गावडे,हणमंत जगताप, अदित्य कोकणे , रमेश दादा गावडे, उपस्थित होत्या.
यावेळी पुढील आदर्श माता म्हणून श्रीमती.गिरीजाबाई रामचंद्र कदम, सौ.नंदा गजानन गावडे, सौ.शोभा राजेंद्र भागवत,सौ.विद्या तानाजी जगताप, श्रीमती. सीमा गोकुळदास कांबळे, सौ.सविता रायाजी जगताप.श्रीमती.इंदुबाई पांडुरंग माने,सौ. पुष्पावती ज्ञानदेव काशीद, सौ.पार्वती हरिभाऊ गेजगे ,सौ.शिला महेश यादव ,सौ.रुक्मिणी रत्नाकर जगताप सौ.लतादेवी किशोर किर्वे ,सौ.सुमन आप्पा बागाव, सौ. कुसुम बबन पवार, सौ.लता कुंडलिक घाडगे यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी बिजवडी येथे आरोग्य सेविका म्हणून नियुक्ती झालेल्या सौ.संध्या अरुण माने यांचा नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन ननवरे सर, सुनील जाधव, प्रवीण निंबाळकर,विकास घोरपडे, किरणं पवार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन ननवरे, राधेश्याम जाधव यांनी केले.