हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

राजाळे ता.फलटण येथील जानाई मंदिर ते सरडे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी ; अतिक्रमण ना काढल्यास 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

(फलटण /प्रतिनिधी)- मौजे राजाळे ता फलटण येथील निखिल तानाजी निंबाळकर यांनी  राजाळे येथील जानाई मंदिर ते सरडे हा रस्ता खुला करावा यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि सदर अतिक्रमण काढले नाही तर १५ ऑगस्ट २०२४ रोजी फलटण तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

सविस्तर निवेदनात पुढील प्रमाणे,महोदय,वरील विषयास अनुसरून विनंती करतो की, मी राजाळे गावाचा रहिवाशी असून आपल्याकडे दिनांक १०-६-२०२२ रोजी ग्रामस्थांच्या सह्यांसह अर्ज केला होता. राजाळे गावातील गट नं. ६२७ व ६२६ मूळ भोगवटादार बाळकृष्ण रामचंद्र बनकर यांची जागा श्री. संतोष पांडुरंग मेघे यांनी विकसन करार करून विकत घेतली होती. त्या जागेतून जाणारा जुना रस्ता महिलांसाठी मंदीरात जाणारा असून मूळ क्षेत्र १४१ चौ.मी. असून त्या रस्त्यावर अतिक्रमण करून व महाराष्ट्र शासन जागेत अतिक्रमण करून ३ गुंठे हून अधिक जागेत बांधकाम केले आहे. जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता हा रस्ता बंद केला आहे. त्यानुसार आपण भूमि अभिलेख कार्यालयाला दिलेल्या सुचनेनुसार मी मोजणीचे पैसे भरून दिनांक १९-१०-२०२२ रोजी भूमि अभिलेख कार्यालयाने रस्त्यात केलेले अतिक्रमण व महाराष्ट्र शासन जागेत केलेले अतिक्रमण क्षेत्रासह नकाशा तयार करून तहसिलदार फलटण, पंचायत समिती फलटण यांना अहवाल सादर केला होता. याबाबत वर्तमानपत्रात बातमी देऊन माजी सनदी अधिकाऱ्याच्या दबावामुळे दोन वर्षे झाले तरी ते अतिक्रमण काढले नाही, माझ्या अर्जानंतर ग्रामपंचायतीत खाजगी मालकाला जागा देऊन अतिक्रमण केले आहे. शासनाच्या जागेत इमारत बांधून शासनाचा कर बुडवला आहे. ग्रामपंचायतीला कोणताही अधिकार नसताना ग्रामपंचायतीने ठराव करून रस्ता बंद केला आहे व त्यात इमारत बांधकामाची परवानगी दिली आहे. आपले स्तरावरून फलटण तहसिलदार, पंचायत समिती यांना दिनांक १४-६-२०२२ रोजी कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तरी फलटण तहसिलदार व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना भूमि अभिलेख कार्यालयाने व पंचायत समितीने अहवाल देऊन अतिक्रमण केलेला नकाशा जोडून तहसिलदार यांचेकडून देऊन एक वर्ष झाले तरी अतिक्रमण काढलेले नाही. रस्ता खुला केला नाही. तसेच महाराष्ट्र शासन जागेत अतिक्रमण केलेले काढले नाही. वारंवार तहसिलदार कार्यालयात जाऊन प्रकरणाची चौकशी केली तरी कोणतेही नोटीस संबंधित खाजगी मालकाला ग्रामपंचायतीला तहसिलदार यांनी काढले नाही. माजी सनदी अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडून तहसिलदार कोणतीच कार्यवाही दोन वर्षे झाले तरी करत नाहीत. तुमच्या कार्यालयाशी केलेला पत्रव्यवहार अर्ज माझ्याकडे आहेत. वारंवार विचारणा करून केलेले अतिक्रमण काढले जात नाही. इथुन पुढे आपण माझ्या अर्जाचा जाणीवपूर्वक विचार न केल्यास मी तहसिलदार कार्यालय फलटण येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी आत्मदहन करणार आहे. माझ्या अर्जानुसार योग्य कार्यवाही केली नाही तर होणाऱ्या अनुचित प्रकारास सर्वस्वी फलटण तहसिलदार, प्रांत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती फलटण व जिल्हाधिकारी कार्यालय सातारा जबाबदार आहेत याची नोंद घ्यावी.

तरी माझ्या अर्जाचा  विचार करून लवकरात लवकर तहसिलदार फलटण व गटविकास अधिकारी पंचायत समिती फलटण यांना अतिक्रमण काढण्याचे आदेश द्यावेत व महाराष्ट्र शासन जागेत केलेले अतिक्रमण व रस्ता खुला करून द्यावा ही विनंती.असं लिहिले असुन माहीती साठी प्रत मा.पोलिस अधिक्षक सातारा, उपविभागीय अधिकारी फलटण, तहसीलदार फलटण यांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!